सावंतवाडी : तालुक्यातील वेत्ये येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यासाठी विशेष ग्रामसभा श्री कलेश्वर पूर्वी देवी मंदिरात उत्साहात संपन्न झाली.

यावेळी सावंतवाडी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे, मंडल कृषी अधिकारी सावंतवाडी १ मनोज देवूलकर, पाणी व स्वच्छता विभाग पंचायत समितीचे अविनाश सावंत, समिल नाईक, मंडल अधिकारी सुधीर मालवणकर, पंचायत राज संस्था आणि समूह ग्राम संघ व प्रभाग संघाच्या बीआरपी प्राची राऊळ, सिंधू कन्या महिला फार्मर कंपनीच्या अध्यक्षा श्रीमती नितेशा नाईक, आरोग्य कर्मचारी श्री दाढेल, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती मीनाक्षी वाढई, माजी सभापती रमेश गावकर, सरपंच गुणाजी गावडे, माजी सरपंच नरेंद्र मिठबावकर, उपसरपंच महेश गावडे, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती स्नेहा मिठबावकर, श्रीमती नंदिनी निगुडकर, श्रीमती तन्वी गावकर, राजेंद्र आंबेकर श्रीमती शितल खांबल, समिती सदस्य कृष्णा पेडणेकर, सागर गावडे, बाबुराव तेंडोलकर, परशुराम पाटकर, दिनेश नाईक, अंकुश गावकर, आशिष गावकर, जितेंद्र गावकर, श्रीमती कविता हरमलकर, शेखर खांबल, सत्यवान गावडे, ज्ञानेश्वर गावकर, शरद जाधव, संतोष गावडे, एकनाथ गावडे भिवा पाटकर, संदीप गावडे, दर्शन हरमलकर, संतोष गावकर, शशिकांत देवूलकर, रामचंद्र पाटकर, सुशील कोळेकर, गिरीश खांबल, अमित नाईक, हरिश्चंद्र गावकर, कृष्णा गावडे, पुंडलिक देवूलकर, महेश बापू गावडे, मुकुंद आंबेकर, यशवंत गावडे, स्नेहा गावडे, संतोषी गावकर, देविदास पाटकर, रामचंद्र निगुडकर, सुरज गावडे, प्रकाश देवूलकर, विजय गावडे, समीर खांबल, आनंद नाईक, प्रथमेश गावडे आदी उपस्थित होते.
दरम्यान ग्रामसभेला गटविकास अधिकारी वासुदेव नाईक तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी संबोधित करून उपस्थित ग्रामस्थ बांधवांमध्ये नव चेतना जागृत केली.
या संपूर्ण ग्रामसभेच्या नियोजनासाठी सरपंच गुणाजी गावडे, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती स्वाती कदम यांसह संपूर्ण ग्रामपंचायतची टीम व अभियानातील विविध समित्यांचे सदस्य यांनी अविरत परिश्रम घेतले.
दरम्यान यावेळी पंचायत राज संस्था आणि समूह ग्राम संघ व प्रभाग संघाच्या बीआरपी प्राची राऊळ यांनी सभेला मार्गदर्शन केले.
माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भगवान गावडे यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.
ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती स्वाती कदम यांनी सभेचे प्रशासकीय कामकाज पाहिले.
शेवटी ग्रामपंचायत सरपंच श्री गुणाजी गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांनी सहभाग वाढविण्याचे आवाहन केले.


