Wednesday, May 21, 2025

Buy now

spot_img

…अन्यथा मातोश्रीवर मोर्चा काढणार.! – आमदार नितेश राणे यांचा इशारा ; लहान मुलांचा छळ केल्याबद्दल आदित्य ठाकरेंविरुध्द तीन तक्रारी – भाजप आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट.

  • लहान मुलांसोबत केलेल्या घाणेरड्या *कृत्यांबद्दल NCPCR आयोगाकडे असलेल्या तक्रारींचा पाढा वाचणार.! 
  • कणकवली : आदित्य ठाकरे यांनी लहान मुलांसोबत केलेल्या घाणेरड्या कृत्यांबद्दल एनसीपीसीआर (NCPCR) आयोगाकडे तीन तक्रारी दाखल आहेत. त्याबद्दल आदित्य आणि उद्धव ठाकरेंनी खुलासा करावा. उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी आदित्य ठाकरे विरुद्ध लहान मुलांचा छळ केल्या बद्दलच्या ह्या तीन तक्रारी अधिकाऱ्यांवर दबाव आणून दाबल्या. आदित्य आणि लहान मुलांचा संबंध काय ? याचा आधी खुलासा करा. अन्यथा मी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राला या तिन्ही तक्रारींची सत्यता माहीत करून देईन. आणि आदित्य ठाकरेकडून लहान मुलांना संरक्षण मिळावे अशी मागणी करणारा मोठा मोर्चा मातोश्रीवर त्या लहान मुलांच्या पालकांना घेऊन काढणार असा इशारा भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी दिला. बदलापूरची जी घटना घडली आहे, त्याबाबत पोलीस आणि सरकारही कोणतीही दयामाया न दाखवता आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी या भूमिकेवर ठाम असून कारवाई सुरू आहे. परंतु ठाकरे सरकार असताना लहान मुलांसंदर्भात केलेल्या कृत्याबाबत स्वतः यांनी माहिती दिली नाही तर मी एनसीपीसीआर कडील माहिती स्वतः घेऊन राज्याला देणार. उद्धव ठाकरेंच्या पोटी असा विकृत मुलगा जन्माला आलाय. मग हे कुठल्या नैतिकतेने अशा घटनांचे राजकारण करत आहेत. पहिले तुमच्या मुलाला आवरा अन्यथा लहान मुले व त्यांचे पालक घेऊन मी स्वतः मातोश्रीवर मोर्चा काढेन आणि आदित्य पासून संरक्षणाची मागणी करेन.
    राज्यात उद्या बंदच्या नावाने अशांतता पसरविण्याचे काम सुरू आहे. शरद पवार यांनी काही दिवसापूर्वीच राज्याचे मणिपूर करू नका असा इशारा दिलेला होता. २७ तारीखला दहीहंडी सण आहे. हिंदू लोक बाहेर पडणार आहेत. महाविकास आघाडीचे नेते व त्यांचे पक्ष हिंदूंचे सण शांततेत होवू नयेत म्हणून ही बंदची हाक दिली आहे.
    भांडुपचा झाकणझुल्या राज्यात शक्ती कपूर ज्या पद्धतीचा रोल हिंदी चित्रपटात करायचा त्या रोलमध्ये आयुष्य जगत आहे. त्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब यांच्यावर बोलण्याचे धाडस करू नये.हा संजय राजाराम राऊत महिला अत्याचाराबाबत बोलत आहे. पोलिसांवर दबावाबाबत बोलतो. त्याची नैतिकतेत आहे का? ज्या डॉ. पाटकर यांना संजय राजाराम राऊत यांनी छळले घरावर दारूच्या बॉटल मारल्या, धमकी दिली. आता तर आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्या महिलेने आरोप करावेत यासाठी दबाव टाकत आहेत.
    तुमचे सरकार असताना पोलिसांना काय गंगास्नान करायला लावत होता का? कोणत्या रेस्टॉरंटवरती पोलीस बदल्याबाबत सौदेबाजी व्हायची वसुली व्हायची ते आम्हाला माहित आहे. त्यामुळे राऊत याने त्याबाबत बोलू नये. पोलिसांचा घरगडी म्हणून वापर केला त्यांच्याच पैशात मातोश्री २ उभी राहिली आहे. संजय राजाराम राऊत हा दीड शहाणा कोर्टालाही सल्ला देत आहे माझी न्यायालयाला विनंती असेल की याबाबत न्यायालयाने सुमोटो तक्रार दाखल करून कारवाई करावी. अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली.
  • काँग्रेस उध्दव ठाकरे यांच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू काढणार.
    आज उद्धव ठाकरे काँग्रेससमोर नाक रगडत असून दिल्लीत जाऊन मुजरा करून आले आहेत. आपल्याला मुख्यमंत्रीपद द्या असे ते सांगायला गेले होते. येणाऱ्या काळात भाजप आपल्याला काय किंमत, मानसन्मान, आपुलकी, प्रेम देत होता हे उद्धव ठाकरेंना कळेल. कारण त्याच्या एक टक्काही प्रेम आपुलकी मविआ त्यांना देत नाही. अमित भाई शहा मातोश्रीवर यायचे पण राहुल गांधी आतापर्यंत कधी तो मातोश्रीवर आलाय का? आज उद्धव ठाकरे दारोदार फिरत आहेत. येणाऱ्या काळात त्यांच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू काँग्रेसवाले काढल्याशिवाय राहणार नाहीत. कर्नाटक मध्ये कुमारस्वामींची जी अवस्था काँग्रेसने केली तीच अवस्था उद्धव ठाकरेंची करतील, असेही नितेश राणे म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles