सिया गोयल पोहोचणार फाशीच्या फंद्यापर्यंत! ; पोलिसांना ‘हे’ मोठे यश.

पिंपरी चिंचवड : पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. केतनला मारण्याचा प्लान सर्व शांत डोक्यानेच तयार करण्यात आला होता. सर्वकाही फिक्स होते. सिया गोयल आणि चेतन चाैधरी हे दोघे तुरूंगात असताना पोलिसांना या प्रकरणात मोठे यश मिळाले. थेट माफीचा साक्षीदार मिळाला. चेतन चाैधरी याच्या दुकानात काम करणारा नीरज कुमार याचा मोबाईल फोन घेऊन चेतन चाैधरी हा लोहगडावर पोहोचला होता.पोलिसांच्या तपासापासून वाचण्यासाठी चेतन चाैधरी याने आपला मोबाईल फोन घरीच ठेवला होता. केतन याला दरीत फेकण्यापूर्वी आणि त्यानंतर नीरज कुमार याच्या मोबाईलच्या माध्यमातूनच तो सियाच्या संपर्कात होता. पोलिसांना तांत्रिक तपासात हे मोठे यश मिळाले. पोलिसांनी नीरज कुमार याचा जबाब नोंदवला आहे. नीरजची ही साक्ष चेतन आणि सिया यांना फाशीपर्यंत पोहोचू शकते.

पोलिसांनी नीरज कुमार यालाच या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनवले. कारण नीरजच्याच मोबाईलवरून चेतन सियाच्या संपर्कात होता. तांत्रित पुरावा पोलिसांना मिळाला. चेतन चाैधरी याने सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत नीरज कुमार याचाच फोन वापरला. चेतनच्याा मोबाईलवर जेवढे फोन आले, तेवढे फोन नीरज याने चेतनच्या सांगण्यावर उचलले.

आपण दुकानावरच असल्याचे तो मुद्द्याम दर्शवत होता. नीरजने पोलिसांना दिलेल्या जबावात स्पष्ट सांगितले की, माझा फोन त्यांच्याकडे होता आणि त्यांचा फोन माझ्याकडे होता. मी त्यांच्या सांगण्यावरूनच फोन उचलत होतो. यामुळे केतन अग्रवाल प्रकरणातून सिया आणि चेतन यांना कोणीही वाचू शकणार नाही. काही तास नीरज कुमार याचा फोन चेतन याच्याकडे होता. याच फोनच्या माध्यमातून चेतन आणि सिया संपर्कात होते. या प्रकरणात नीरज कुमार याची साक्ष अत्यंत महत्वाची आहे. नक्की काय घडले हे त्याने सांगितले. पोलिसांनी नीरज कुमार याला माफीच्या साक्षीदार बनवल्याने सिया आणि चेतन यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. चेतन हा लोहगडावरच होता. मात्र, तो आपली ओळख लपवत होता. कोणत्याही पद्धतीत त्याला आपली ओळख जाहीर होऊ द्यायची नव्हती.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles