मुंबई : कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या घरच्या मैदानात झालेल्या पाचव्या आणि अंतिम टी – 20 सामन्यात अभिषेक शर्मा याने धमाका केला. अभिषेक शर्मा याने 13 सिक्स आणि 7 फोरसह 135 धावांची वादळी खेळी केली. टीम इंडियाने अभिषेकच्या या खेळीच्या जोरावर वानखेडे स्टेडियमध्ये 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 247 धावा केल्या. टीम इंडियाच्या फंलदाजांनंतर गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली. इंग्लंडचा 97 धावांवर खुर्दा उडवत टीम इंडियाने 150 धावांच्या फरकाने विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांची मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. अभिषेक शर्मा याने बॅटिंगनंतर बॉलिंगनेही योगदान दिलं. अभिषेकने 2 विकेट्स घेतल्या. अभिषेकला या ऑलराउंडर कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.


वरुण चक्रवर्ती याने मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. राजकोटमध्ये झालेल्या तिसर्या सामन्यात 5 विकेट्स मिळवल्या. चेन्नईत 2 तर कोलकातामध्ये 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.