Tuesday, May 13, 2025

Buy now

spot_img

५ लाख अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार? ; ‘ही’ आहे सर्वात मोठी अपडेट.

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडक्या बहिण योजनेबाबत मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल पाच लाख महिला या अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. ज्या महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे, त्या महिलांना या योजनेंतर्गत मिळणारा लाभ देखील आता बंद होणार आहे. मात्र आता अनेकांना असा प्रश्न पडला आहे की? ज्या महिलांना अपात्र ठरवण्यात आलं, त्यांच्याकडून यापूर्वी वितरीत करण्यात आलेले पैसे देखील वसूल केले जाणार का? याबाबत आता मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी अपडेट दिली आहे.

नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे? 

कोणत्या महिलांना मिळणार नाही लाभ?

दरम्यान याबाबत देखील मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

‘दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे.

अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे :

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – २,३०,००० वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला – १,१०,००० कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – १,६०,००० एकुण अपात्र महिला – ५,००,०००

”सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे !’ असं ट्विट आदिती तटकरे यांनी केलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles