नारी शक्तीच्या कार्यकर्तृत्वाला सलाम! ; सौ. वेदिका विशाल परब यांच्या हस्ते सावंतवाडीत कर्तृत्ववान महिलांचा गौरव!

सावंतवाडी : “इमान इथल्या मातीशी, माणुसकीच्या नात्याशी” हे ब्रीद जपत सामाजिक कार्य करणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस या संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत ‘नारी अभ्युदय महोत्सव’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यान येथे शुक्रवारी सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्त्रीशक्तीचा सन्मान आणि महिलांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेदिका विशाल परब उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन करताना महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे येण्याचे आवाहन केले. तसेच महिलांच्या कर्तबदारीबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करत आज महिला सर्व स्तरावर आघाडी मिळवत असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे सांगितले.

या महोत्सवात जिल्ह्यातील नव्याने निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींचा यथोचित सन्मान करण्यात आला. यामध्ये जिल्हा परिषद सदस्या प्रियानी संजय नाईक, सुवर्णा वसंत सांगेलकर, सुजाता अजित पडवळ, श्वेता सूर्यकांत धर्णे , साक्षी गणेश तडवडेकर, तसेच पंचायत समिती सदस्या अवनी अमित राऊळ, धनश्री मराठे, ऋतिका नाईक (सावंतवाडी), सोनाली अंकुश नाईक-कुबल (दोडामार्ग), साक्षी शैलेश नार्वेकर आणि प्रियांका घावड (वेंगुर्ला) यांचा समावेश होता.

याशिवाय नगरपालिका व नगरपंचायत प्रतिनिधी दिपाली भालेकर, सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर, सुनीता पेडणेकर, निलम परिमल नाईक,  रिया वासुदेव केरकर, काजल किरण कुडाळे, लीना समीर मम्हापणकर, नमिता रोहित रेडकर (वेंगुर्ले), गौरी पारकर, संजना मेहावणकर, क्रांती माधव आणि संध्या प्रसादी (दोडामार्ग) यांचाही सन्मान करण्यात आला.

तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विनिता विलास देसाई, मोहिनी मोहन रेडकर, स्मिता सुनिल गावडे, रूपा मृगेश गौंडर-मुद्राळे, नेहा नारायण परब, नुपूर अक्षय मडकर, मेघना प्रकाश राऊळ, सुजाता बाळकृष्ण गोसावी, भाग्यलक्ष्मी शिवप्रसाद घाटे, अनन्या सत्यवान तेंडोलकर आणि अमृता आशिष पांडगावकर या ११ महिलांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात पारंपरिक हळदी-कुंकू समारंभ तसेच महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘सौभाग्य संध्या’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमामुळे वातावरण अधिक रंगतदार झाले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून वेताळ प्रतिष्ठानच्या या उत्तम उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles