मराठी अस्मिता असलेल्या शिवरायांचा पुतळा कोसळणे दुर्दैवी, बांधकामातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी.! ; रा. काँ. शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत.

कुडाळ : अखंड मराठी अस्मितेचे मानबिंदू असलेले, प्रत्येक भारतीयांच्या हृदयात वसलेले छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळणे हे अत्यंत दुर्दैवी व खेदजनक आहे. केवळ आपल्या नेत्यासाठी चमकुगिरी करून हा पुतळा घाईघाईत उभारला गेला. शेकडो वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी उभा केलेला सिंधुदुर्ग किल्ला हा दिमाखात उभा आहे. मात्र त्याच सिंधुदुर्ग किल्ल्यावर केवळ ९ महिन्यांपूर्वी उभे केलेले छत्रपती शिवरायांचा पुतळा अचानक कोसळतो. ही बाब खेदजनक असून या बांधकामातील दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles