सावंतवाडी : कणकवलीचे आमदार नितेश राणे यांची कामाची पद्धत अतिशय वाखाणण्याजोगी आहे. ते व्हिजनरी आमदार आहेत, त्यांच्याशी माझे संबंध चांगले आहेत. ज्येष्ठत्वानुसार त्यांनी काल माझ्याबद्दल आदरपूर्वक ते विधान केलं असेल, असे वक्तव्य राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. मुंबई मंत्रालय येथून त्यांनी दुरुस्त प्रणालीद्वारे आज पत्रकारांशी संवाद साधला.
मात्र, महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वांनीच एकत्र राहील पाहिजे, हे मी सांगितले आहे. निश्चितचं आमदार नितेश राणे पुन्हा मोठ्या फरकाने निवडून येतील. स्व. बाळासाहेब व नारायण राणे यांचं नातं वेगळं होतं. शिवसेनेशी त्यांची जवळीक राहीलेली आहे. खासदार राणेंची सुरुवातच शिवसेनेतून झालीय. त्यामुळे हे संबंध असेच कायम रहावे, त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांसोबत रहावं अशीच आमची भूमिका असणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, जिल्ह्यातील महायुतीबाबत बोलण्यास केसरकरांच नेतृत्व पुरेसं आहे. आजूबाजूच्या नेत्यांना लुडबुड करू देऊ नका, या आमदार नितेश राणेंच्या विधानाबाबत विचारलले असता मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले.