राज्यावर मोठं संकट!, पुढचे ७२ तास अलर्ट! ; दुपारी १ ते ४ घरीच थांबा, हवामान विभागाचा इशारा काय?

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता उष्णतेचा पारा चढला आहे. काही भागात उष्णतेच्या लाटेची इशारा देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामानामुळे सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील 72 तास नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे सल्ला देण्यात आला आहे.

कोकण विभागात आज हवामान कोरडे राहणार असले तरी समुद्रकिनारी भागात दमट वातावरणामुळे उकाडा अधिक जाणवेल. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. विशेषत: दुपारच्या वेळी उष्णतेचा त्रास जास्त जाणवू शकतो.

मध्य महाराष्ट्रात मात्र उन्हाची तीव्रता अधिक वाढणार आहे. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये सकाळी हलका गारवा जाणवला तरी दुपारनंतर तापमान झपाट्याने वाढेल. या भागात कमाल तापमान ३६ ते ३८ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी पुढील ७२ तासांसाठी उष्ण आणि दमट हवामानाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

मुंबईचे हवामान –

एखाद्या ठिकाणची भौगोलिक स्थिती तेथील हवामान कसे असेल हे ठरवते. मुंबईची भौगोलिक स्थिती बोलायची झाली तर ती १९.०७६ डिग्री अक्षांश आणि ७२.८७७७ डिग्री देशांतरावर येते. मुंबईच्या हवामानाबाबात बोलायचे झाले तर आज १३ एप्रिल २०२६ रोजी तापमान २८ डिग्री नोंदवले गेले आहे. कमाल तापमान ३० डिग्री आणि किमान तापमान २८ डिग्रीच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. सूर्योदयाचा वेळ सकाळी ०६:२२ AM आहे, तर सूर्यास्त संध्याकाळी ०६:५४ PM वाजता होईल. आर्द्रतेचे प्रमाण ५७% आहे, तर वातावरणातील दाब १०११ च्या पातळीवर आहे.

आज आणि पुढील ६ दिवसांचे कमाल तापमान अनुक्रमे ३०, ३३, ३२, ३१, ३२, ३३, ३२ डिग्री राहण्याची शक्यता आहे. या माहितीमधून आज मुंबईचे हवामान कसे राहील याचा अंदाज लावणे सोपे आहे. तसेच, शहराच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर आजच्या हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाचा स्तर १५४ आहे. AQI चा हा स्तर ‘Poor’ श्रेणीत येतो. येथे PM 2.5 चे स्तर १५४ आहे, तर PM 10 चे स्तर १३३ आहे. हवेच्या गुणवत्तेचा स्तर आपल्याला हे ठरवण्यास मदत करतो की बाहेर पडताना किती काळजी घ्यावी. जर हवा खराब असेल तर गरज पडल्यासच बाहेर पडणे आणि मास्क घालणे यासारखे उपाय केले जातात.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles