पुणे : शेतकरी बांधवांनी येत्या दोन दिवसांमध्ये शेतातील सर्व कामे उरकून घ्यावीत, कारण राज्यात २ सप्टेंबरपासून पुन्हा मुसळधार पावसाचे संकेत हवामान अभ्यासकांनी दिले आहेत. हवामान अभ्यासकांनी म्हटले आहे की कारण येत्या दोन ते सहा सप्टेंबर दरम्यान राज्यभरामध्ये जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.
पंजाब डख यांनी शुक्रवारी हवामान अंदाज व्यक्त केला असून ज्यानुसार शेतक-यांनी शेतीची सर्व कामे करून घेण्याचे सांगितले आहे. कारण राज्यातील जवळपास २१ जिल्ह्यांमध्ये २ सप्टेंबरपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. तर तो पाऊस ६ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. पावसाची सुरुवात विदर्भातून होणार आहे. या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन ते पाणी जायकवाडी धरणात येणार आहे. सध्या जायकवाडी धरण ७० टक्के भरले असून २ ते ३ दिवसांत ते ८० टक्केच्या वर जाणार असून सप्टेंबर महिन्यात शंभर टक्के भरणार आहे. त्यानंतर पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे.
धरणाखाली असलेले दहा ते बारा बंधारे या मुसळधार पावसाने भरणार असल्याचे ही पंजाब डख यांनी सांगितले आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे अवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.