व्ही. के. सिंगला धरलं तर अनेक नावं समोर येतील! ; अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक.

लखनऊ : राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे.28 जानेवारीला व्हीएसआर कंपनीच्या विमानाला बारामतीजवळ अपघात झाला आणि त्यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. मात्र या अपघातावरून संशय व्यक्त करत अजित पवारांचे पुतणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या महिन्याबरापासून ते या विषयावर विविध सवाल उपस्थित करत असून हा अपघाता आहे की घातपात?, याची चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे. तसेच या प्रकरणात व्हिएसआर कंपनी, तिचा मालक यांना जी सूट मिळते त्यावरही त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. आज रोहित पवार यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत अनक सवाल उपस्थित केले.

गेल्या काही दिवसांपासून ते देशातील विविध नेत्यांची भेट घेत असून आज ते सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत त्यांनी व्हीएसआर कंपनीबद्दलही काही प्रश्न, शंका उपस्थित केल्या.

रोहित पवारांचं म्हणणं काय ?

अपघाताच्या दिवशी व्हिजीबिलीटी कमी होती, 3000 इतकी, तेव्हा विमानाचे कॅप्टन कपूर यांनी व्ही.के सिंग यांना फोन करून सांगितलं होतं की व्हिजीबिलीटी खराब आहे, आत्ता आम्ही टेक ऑफ करू शकत नाही. मात्र तेव्हा व्ही. के सिंगनी त्याला सांगितलं की तू टेकऑफ कर, बाकीचं मी नंतर पाहीन, असा दावा रोहित पवार यांनी केला. हे मी जे बोलतोय त्याचा पुरावा म्हणजे, सिंगचे सीडीआर काढून त्यात काय संभाषण झालं ते तपासता येऊ शकतं. कपूर हा पायलट होता, अपघाताच्या दिवशी त्यांच्या रक्तात कुठेही ड्रग्स, दारू , विषंही नव्हतं. काही दारू न पिता सुद्धा, त्याने जे केलं ते का केलं असेल, त्याच्या खोलात जावं लागेल, असं रोहित पवार म्हणाले. त्याच्यावर काही दबाव होता का , व्ही के सिंग यांना का वाचवलं जात आहे, असा सवालही सर्वांच्या मनात आहे.

मला व्ही. के सिंग किंवा व्हीएसआरशी घेणं देण नाही, पण अजित दादा जेव्हा विमानात होते, तेव्हा ते विमान पडलं की ते पाडण्यात आलं ? हाच माझा प्रश्न असून त्याची उत्तर हवी आहेत. व्ही के सिंग आणि व्हीएसआरला वाचवलं जातं आहे, या विधानाचा रोहित पवार यांनी पुनरुच्चार केला. कारण व्ही. के सिंगला जर ताब्यात घेतलं, तर तो काही लोकांची नावं घेईल,  अशी त्यांना भीती आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles