Sunday, May 18, 2025

Buy now

spot_img

शाळा आणि समाज यांचे नाते घट्ट – प्रा. रुपेश पाटील., कळसुलकर हायस्कूलच्या ‘शिक्षण सप्ताहा’ची उत्साहात सांगता.

सावंतवाडी : शाळा आणि समाज यांचे नाते घट्ट आणि एकमेकांशी जोडलेले आहे. शाळा हे ज्या व्यापक समाजात वसलेले आहेत त्या समाजाचे प्रतिबिंब आहेत आणि त्या व्यक्तींच्या मूल्ये, ज्ञान, कौशल्ये आणि समाजीकरणाला आकार देण्यात आणि प्रभावित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रूपेश पाटील यांनी शहरातील कळसुलकर प्रशालेत केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त प्रशालेत शैक्षणिक सप्ताह साजरा करण्यात आला त्याचा समारोप प्राध्यापक रुपेश पाटील यांच्या ‘शाळा व समाज नातेसंबंध’ या विषयावरील व्याख्यानाने झाला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठस्कर यांनी भूषविले, यावेळी विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांची सत्कार करण्यात आले. यात मुख्य वक्ते प्रा. रूपेश पाटील यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व स्मरणिका देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शिक्षकेतर कर्मचारीमधून वैभव केंकरे, माजी शिक्षक संतोष वैज, माजी प्राचार्य अशोक कुलकर्णी, माजी सैनिक श्री. राऊळ, प्राथमिक विभागातर्फे प्राथमिकचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, सहाय्यक शिक्षिका एस. यु. बांदेकर यांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख यु. आर. पाटील, संस्था संचालिका श्रीमती. श्रद्धा नाईक आदी उपस्थित होते.

 

दरम्यान व्याख्यानात प्रा. रुपेश पाटील पुढे म्हणाले की, शाळा व्यक्तींना सक्रिय आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी तयार करतात. ते नागरी शिक्षण देतात, विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि लोकशाही संस्थांचे कामकाज शिकवतात. शाळा लोकशाही मूल्ये, टीकात्मक विचार आणि सामाजिक जागरूकता वाढवतात, व्यक्तींना नागरी जीवनात सहभागी होण्यासाठी तयार करतात आणि समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देतात. विद्यार्थ्यांना सामाजिक नियम, मूल्ये व नैतिक मानकांमध्ये सामाजिकीकरण करण्यात शाळा महत्त्वाची भूमिका बजावतात. ते विद्यार्थ्यांना स्वीकारार्ह वर्तन, नैतिक तत्त्वे आणि सामाजिक जबाबदाऱ्या शिकवतात. शाळा नैतिक आचरण, सहानुभूती, विविधतेचा आदर आणि जबाबदार नागरिकत्व, समाजाच्या नैतिक फॅब्रिकला आकार देतात.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे यांनी केले तर सत्कार मूर्तीकडून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये संतोष वैज यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. यु. बांदेलकर यांनी केले तर आभार अनिल ठाकूर यांनी मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles