Tuesday, May 13, 2025

Buy now

spot_img

‘राणे’ हे नाव नव्हे ब्रँड आहे, कट्टर राणे समर्थक आर्थिक अमिषाला कधीच बळी पडू शकत नाही.! : अमित वेंगुर्लेकर यांचा विश्वास.

सावंतवाडी : कोकणचा विकास प्रगती पथावर घेऊन महाराष्ट्राच्या इतिहासात समाविष्ट असलेल्या इतर कोणत्याही जिल्ह्यात जेव्हा कोकणी माणसाच्या चर्चेचा विषय येतो, तेव्हा समोरचा एकच प्रश्न निर्माण करतो, “कुठून आलात?, दादांच्या सिंधुदुर्गातील तुम्ही ना ?,  ही प्रतिक्रिया कित्येक जनसामान्यांना प्रवासात, नोकरीच्या निमित्ताने एव्हढेच नव्हे तर परदेशातही व्यक्त केली जात आहे. मात्र इथले स्थानिक पातळीवर सेकंद काटा आर्थिक विकास महामंडळ कार्यकर्ते कोकणच्या सर्वांगीण प्रगती, अभ्यास, दळणवळण, आरोग्य सेवा, हक्काची नोकरी अरे असा कोणता प्रश्न जो कोकणचे भाग्यविधाते नारायणराव राणे साहेब यांनी सोडवला नाही/,  विरोधकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याआधीच साहेबांचे प्रतिउत्तर जे जनहितासाठी सर्वसामान्यांच्या सुखसुविधांना सर्वांगिण प्रगती पथावर नेण्यासाठी शासकीय अधिकारींच्या नियमावलीत तंतोतंत लागू करून शासनमान्य झालेले कित्येक अनुभव विरोधकांना नामोहरम करण्यासाठी पुरेसे नाहीत का?

कोकणी माणूस हा फक्त राणे साहेबांच्या कार्यतत्पर जनसेवेला आदराने सन्मान देतो. शासकीय अधिकारींच्या बाबतीतही असे बरेच अनुभव विरोधकांना चोख प्रत्युत्तर देऊन गेलेत की, राणे साहेबांनी शासकीय खात्याला नेहमीच आदराची वागणूक दिलेली आहे. त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी क्षणाचाही विलंब लावला नाही. असे कित्येक अनुभव विरोधकांना नामोहरम करण्यासाठी पुरेसे नाहीत का?,
जसे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण ह्या प्रमुख गरजा जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या हितासाठी सदैव कार्यतत्पर राहून गोरगरीब कुटुंबात जनतेच्या हितासाठी सर्वांगीण विकास प्रगती पथावर नेण्यासाठी नारायणराव राणे साहेब यांचीच आवश्यकता आहे.
कोकणात मोठमोठे उद्योजक आहेत. परंतु कोरोना सारख्या महाभयंकर काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फक्त  राणे साहेबांचं रुग्णालय गोरगरिबांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण, हे आपले कर्तव्य समजून जनसेवा करत होते.  आजही संबंधित  रुग्णालयात सर्वसामान्य गोरगरीब जनतेला अनेक शाकीय सुविधा राणे साहेबांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत., आज सुजाण व सुशिक्षित मतदारांना एव्हढीच कळकळीची विनंती आहे की, सारासार पाहावा !, विरोधकांची आंधळ्याची भूमिका चालवून घेऊ नका. तुमच्यामध्ये वास्तविक जो कोणी बुद्धिमान असेल त्यास पुढारी करा. त्याच्या अनुमतीने चाला, आपलं एक मतदान बहूमूल्य आहे. आर्थिक व्यवहाराच्या विळख्यात सापडून मतदान करू नका ?
पुढील पाच वर्षांत सर्वांगीण विकास प्रगती पथावर नेण्यासाठी योय उमेदवारास मतदान करा, अशी विनंती मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन तर्फे प्रदेश सचिव श्री.  अमित वेंगुर्लेकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles