देवदर्शनाला निघालेल्या बसला मोठी आग, तब्बल ७ लोक जिवंत जळाले! ; २२ जण गंभीर जखमी.

दौसा : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या दाैसा येथे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे वरून हरिव्दार हून इंदोरला जाणाऱ्या टूरिस्ट बसला ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी जास्त खतरनाक होती की, जागीच बसने पेट घेतला. या बसमध्ये तब्बल 37 प्रवासी होते. सर्वजण देवगदर्शनाला निघाले होते. कोणालाही काहीही कळण्याच्या आत बसणे पेट घेतला. आगीचा भडका इतका जास्त उडाला की, कोणालाही बसच्या बाहेर येण्याची साधी संधीही मिळाली नाही. या आगीत तब्बल 7 यात्री जिवंत जळाले. 22 जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र, या धडकेनंतर आग नक्की कशी लागली. याबाबतची काही माहिती पुढे येऊ शकली नाही. या आगीच्या घटनेने मोठी खळबळ उडाली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत 7 जण जिवंत जळाले आहेत. जखमींना जवळच्याच रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बचावकार्याच्या सुरूवातीलाच 6 मृतदेह बाहेर काढण्यात आली. त्यांना तात्काळ रूग्णालयात पाठवण्यात आले. घटना घडल्याची माहिती मिळताच पोलिस, अग्निशामक आणि बचावकार्याची टीम पोहोचली.

देवदर्शनाला निघालेल्या बसला मोठी आग –

दाैसा पोलिस अधिक्षक पीयूष दीक्षित घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या. जखमींवर उपचार सुरू आहेत. मात्र, ही इतकी भयंकर आग नक्की कशी लागली. याबाबत फार जास्त माहिती कळू शकली नाही. पोलिसांकडून या घटनेचा तपास हा केला जात आहे. या आगीत बस पूर्णपणे जळाली आहे. परिसरातील लोकांनीही बचावकार्यास मदत केली.

22 जण गंभीर जखमी उपचार सुरू –

हे सर्व यात्री देवदर्शनासाठी निघाल्याची माहिती आहे. रात्रीच्या वेळी ही धक्कादाक घटना घडली. आग लागल्यानंतर तात्काळ बचावकार्य राबवण्यात आले. ज्यामुळे मोठी हानी टळल्याचे सांगितले जात आहे. जसी शक्य आहे तशी लोकांनी मदत केली. या घटनाचा अधिकचा तपास केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून बसला आग लागण्याच्या घटनांमध्ये सतत मोठी वाढ होताना दिसत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles