सावंतवाडी : दिनांक १५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा आहे. या पौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे शहरातील प्रत्येक मंदिरामध्ये दीपोत्सव होत असतो. यंदाही सर्व महिला – भगिनींनी आपल्या जवळच्या मंदिरामध्ये पाच तरी पणत्या लावून या दीपोत्सवामध्ये सहभागी होऊया, आपल्या जवळची सर्व मंदिरे दीपोत्सवाने उजळावेत, म्हणून प्रत्येकाने यात सहभाग द्यावा.
तरी महिला भगिनींना तसेच विविध मंडळ, देवस्थान कमिट्या यांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या जवळच्या मंदिरामध्ये प्रत्येकाने पाच पणत्या लावून शहराचा दीपोत्सव साजरा करूया, अशी विनंती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.