सावंतवाडी : सह्याद्री फाउंडेशनने कोकणी रानभाजा टिकाव्यात, त्यांना आगामी काळात जागतिक ओळख निर्माण व्हावी आणि पुढील पिढीला त्याची वेगळी निर्मिती करता यावी, यासाठी गेली पाच वर्ष अशी स्पर्धा घेत आहे. येत्या काळात ही स्पर्धा अधिक व्यापक केली जाईल, असे ते मत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केले.सह्याद्री फाउंडेशन मान्सून महोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या रान भाजी स्पर्धा व प्रदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी स्वच्छता विभाग मुख्याधिकारी सागर साळुंखे, संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मडगावकर. कार्यप्रमुख ॲड. संतोष सावंत. सचिव प्रताप परब, माजी सचिव प्रल्हाद तावडे, उपाध्यक्ष विभावरी सुकी, मोहिनी मडगावकर. खजिनदार हर्षवर्धन धारणकर, प्रमोद सावंत, शशिकांत मोरजकर गजानन बांदेकर., सुहास सावंत, .तार के सावंत. नारायण राणे,. शैलेश सरंबळकर, किशोर रावराणे. गोपाळ राऊळ, . कृष्णा परब,. गुरुनाथ सावंत, विक्रम परब, अजय गोंदावळे, विनोद सावंत, परिक्षीत मांजरेकर. श्रीसा टलकर आदी उपस्थित होते.परीक्षक. हेमलता सावंत, संगीता दळवी, वैदही गावडे. संगीता पाटकर. मंगल देसाई आदी उपस्थित होते.
म्हणाले यावेळी संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ यांनी मानसून महोत्सवानिमित्त विविध स्पर्धा घेतल्या जात आहेत. रानभाजी स्पर्धा घेऊन आरोग्याच्या दृष्टीने सर्वात ही महत्त्वाची अशी स्पर्धा होती. रानभाज्या आरोग्यदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि ते टिकावे यासाठी अशा स्पर्धा आम्ही घेत आहोत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सावंत यांनी केले तर मोहिनी मडगावकर यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी स्पर्धकांमधून सौ मडगावकर यांनी आपले विचार मांडले यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.