Tuesday, May 13, 2025

Buy now

spot_img

मुलांच्या मोबाईल वापरावर आवर घालण्यासाठी स्वतःलाही मोह टाळता आला पाहिजे.! : मुक्ता चैतन्य. ; ‘मोबाईलचं करायचं काय.?’ विषयावर सावंतवाडीत व्याख्यान.

सावंतवाडी : इंटरनेटने, स्मार्ट फोन अन् सोशल मीडिया यांच्यामुळे जग बदललं आहे. माणसाचा सामाजिक डीएनए या तीन गोष्टींमुळे झपाट्याने बदलला आहे. त्यामुळे तांत्रिक शिक्षणाकडू़न माध्यम शिक्षणाकडे आपल्याला जावं लागेल, काळाची ती गरज आहे. माध्यम शिक्षित होण एवढंच आपल्या हातात राहीले आहे. मुलांच्या मोबाईल वापरावर आवर घालण्यासाठी आधी स्वतःलाही त्यावर स्वतःलाही मोह टाळता आला पाहिजे, असे प्रतिपादन सायबर जर्नलिस्ट मुक्ता चैतन्य यांनी केले. सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सेवांगण आयोजित ‘मोबाईलचं करायचं काय.?’ या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

यावेळी मुक्ता चैतन्य म्हणाला, तांत्रिक शिक्षणाकडू़न माध्यम शिक्षणाकडे आपल्याला जावं लागेल काळाची ती गरज आहे. . इंटरनेटने आपल्याला एकमेकांच्या फार जवळ आणलं आहे. तर स्मार्ट फोन अन् सोशल मीडिया यांच्यामुळे जग बदललं आहे. आपलं जगणं सर्वार्थाने बदललं असून माणसाचा सामाजिक डीएनए या तीन गोष्टींमुळे झपाट्याने बदलला आहे. इन्टा, फेसबुक, व्हॉट्सॲप, युट्यूब ही प्रॉफिट मिळवणारी बिझनेस माध्यम आहे. ही माध्यमं म्हणजे एनजीओ नाहीत. त्यामुळे ग्राहक म्हणून याचा आपण विचार केला पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केल.

तंत्रज्ञान बदलात माध्यम शिक्षित होण एवढंच आपल्या हातात आहे. मोबाईल नावाचं गॅझेट पुढील काही वर्षांत संपून जाणार आहे. कारण, दुसऱ्या पद्धतीच तंत्रज्ञान विकसित होऊ लागलं आहे. बाजारत ते आल आहे. कल्पनाही करू शकत नाही अशा पद्धतीत ते विकसित झालं आहे. हे तंत्रज्ञान जसं फायद्यासाठी वापरल जात तसे ते सायबर गुन्हेगारांच्या हातातही आहे हे विसरून चालणार नाही. एआयमुळे तुमचा फोन तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. फोन आपला शत्रू नाही. पण, तो‌ किती वापरायचा हे महत्त्वाचे आहे. मुलांच्या मोबाईल वापरावर आवर घालण्यासाठी आधी स्वतःही त्याला आवर घातला पाहिजे असं मार्गदर्शन त्यांनी केलं. तसेच सायबर क्राईमची फार गंभीर परिस्थिती आहे. मोह आड येतो अन् फसवणूकीचे प्रकार घडतात. क्रिमीनल्स तुमच्यापर्यंत पोहचणार नाही या भ्रमात राहू नका. डिजीटल स्पेस वापरताना काळजी घ्यावीच लागेल. सायबर जगात अलर्ट राहाणं व ते मुलांना शिकवण आवश्यक आहे असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या माध्यमातून मुलांच्या मोबाईलचे करायचे काय ? या कार्यशाळेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील सायबर जर्नलिस्ट मुक्ता चैतन्य यांनी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात अँड. संदीप निंबाळकर यांनी बॅ. नाथ पै यांच्या कार्याची महती विषद करत नाथ पै सेवांगणच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक मुक्ता चैतन्य, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, अँड परिमल नाईक, अँड. संदीप निंबाळकर, फादर मिलेट डिसोझा, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, लक्ष्मीकांत खोबरेकर, महेश परूळेकर, अँड. शामराव सावंत, अँड. पी.डी.देसाई आदींसह विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles