सावंतवाडी : दिनांक ९ ऑक्टोबर २०२२ रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपी ते मुंबई विमानसेवा उद्घाटन केले होते. सदर विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती. त्यांची मुदत येत्या २६ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. सदर विमानसेवेला प्रवासी वर्गाचा चांगला व सकारात्मक प्रतिसाद होता. मात्र असे असताना आता ऐन निवडणुकीच्या काळात सदर विमानसेवा बंद होत आहे. सामान्य जनता या विमान सेवेच्या लाभापासून वंचित राहणार असल्यामुळे अनेक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.



