सावंतवाडी : मला सावंतवाडी मतदार संघातील जनतेचं प्रेम खूप मिळालं आणि मिळतं आहे. येथील जनता हृदयापासून माझ्या पाठीशी आहे. आजपर्यंत सावंतवाडी मतदारसंघातील सर्व स्तरावरील जनतेने मला प्रेम दिलं. आज वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला असला तरी येथील जनतेचं मला भरभरून प्रेम मिळालं आहे. आजपर्यंत सावंतवाडी मतदार संघाला न्याय मिळाला नाही. याचं कारण आपण शोधायला हवं. आज रोजगार आणि आरोग्य या मूलभूत समस्या कायम आहेत. ही आता विकासासाठीची लढाई आहे. अस्मितेची लढाई आहे, म्हणून आता आपण निष्ठावंत म्हणून आपण आपली लढाई सुरू ठेवू, असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार म्हणून लढणाऱ्या अर्चना घारे – परब यांनी केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर, पुंडलिक दळवी, प्रदीप चांदेलकर, योगेश कुबल, संदीप गवस, सौ. दीपिका राणे, ऍड नकुल पार्सेकर, सौ. ममता नाईक, सौ पूजा दळवी, सौ सिद्धी परब देवेंद्र टेमकर, याकुब शेख, नियाज शेख, काशिनाथ दुभाषी, फैजान शेख, सुदेश तुळसकर, हिदायतुल्ला खान, संजय भाईप, अजित नातू, भावतीस फर्नांडिस, सौ. मारिता फर्नांडिस, सौ. गौरी गावडे, सौ. कोरगावकर, सुनिता भाईप, कृष्णा नाईक, विनायक परब, सौ. नितीशा नाईक, सुधा सावंत, टएड. सायली दुभाषी, संतोष जोईल, नवल साठेलकर, ऋत्विक परब, विवेक गवस, सूर्यकांत धरणे, बंटी कांबळे, सत्यवान साटेलकर, तौसीफ आगा, नारायण आसोलकर, सूर्याजी नांगरे, विशाल बागायतकर, विलास सावळ व महादेव देसाई, गौतम महाले, साबाजी देसाई, सागर नाईक, आधी उपस्थित होते.