मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस भारतासाठी ‘कभी खुशी कभी गम’ असा राहिला. शुभमन गिल आणि ऋषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात संघाची धावसंख्या 263 धावांपर्यंत नेली. यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. न्यूझीलंडने दुस-या दिवसाच्या खेळात 171 धावा केल्या आहेत. या काळात त्यांनी 9 विकेट गमावल्या आहेत.