ठाणे : नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे भाष्य केले. एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, भूमी पूजनसाठी आम्ही काम थांबवले नाही. पेपरमध्ये येणारनंतर काम करू असे आम्ही केले नाही. वेळेत प्रकल्प पूर्ण करू. तीन हात नाका येथे अनेक भूगर्भात अनेक लाईन आहेत. त्यामुळे एशियामध्ये सर्वात जास्त वेळ या तीन हात नाका ठिकाणी थांबावे लागते. ते आता वाहतूककोंडी मुक्त होणार. 15 सेकंद लागणार. नौपाडा, वागळे, नवीन स्टेशन, कोपरीकडे जाणार. सोपी कामे सर्व करतात. मात्र, आम्ही अवघड कामे करतो. सर्व मंजुरी मिळाल्या. हा प्रकल्प गेम चेजर प्रकल्प आहे. फ्री वे, कोस्टल रोड होत आहे. शहरात या गाड्या येणार नाही. प्रदूषण वाहतूक कोंडी, अपघात कमी होणार. ठाणे – बोरिवली टनेल आता 20 मिनिटमध्ये जाता येणार. गोरेगाव – मुंबई लिंक रोड प्रमाणे ठाणे – बोरिवली प्रकल्प होत आहे.
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, ”सचिन आहेर स्टेजवरून बोलले, वरळीत लक्ष द्या. आम्ही तिथली ट्रॅफिक कमी करू लक्ष देऊ. ठाणे बदलत आहे तसे वरळी देखील बदला. आव्हान असलेला प्रकल्प लोणावळा येथे केला. आम्ही काम केलेले परफेक्ट आहे. असा कधी पडतो का? किती तरी प्रकल्प स्टे आणले. आमचे प्रगती सरकार, काय प्रोजेक्ट आम्ही केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टीम वेगाने काम करत आहे. पॉड टेक्सी बनत आहे. इंटरनेल मेट्रो करत आहे. ठाणे बदलत आहे. ठाणेकरांची स्वप्नपूर्ती होत आहेत. आनंद दिघे लोकप्रतिंधी मागे उभे राहिले. आम्ही कोणालाही बेघर केले नाही. सर्वांना घरे दिली. अगोदर लोकांचा पाय ब्रेकवर, होता आमचा पाय एक्सिलेटरवर आहे. पुढे एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, फेको नाही स्पेको प्रकल्प आहे. आम्ही लवकर प्रकल्प केला तर इंसेंट्विव देऊ. अनेक प्रकल्प मार्गी लावत आहे. 900 बेडची आरोग्य व्यवस्था आपण सिव्हिल रुग्णालयाची करत आहे. पर्यावरण रक्षण करत अनेक प्रकल्प करत आहे. अधिकारी यांनी काम वेळेत करावे. आजूबाजूच्या नगरसेवकांनी हातभार लावावा. कोणीही हस्तक्षेप कराल तर मी आहे. मला सांगा”, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
ADVT –



