मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ मानद पदवी. ; कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राहुरी विद्यापीठातर्फे गौरव.

अहिल्यानगर :  शेती व शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी बहाल करण्यात आली.
ही पदवी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. कृषी क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना मिळालेला दिलासा, तंत्रज्ञानाचा वाढता वापर, उत्पादनक्षमता वाढ आणि शेतीचा विकास या कामांची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या सन्मानामुळे राज्यातील शेतकरी, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या मानाच्या सन्मानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्वत्र मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles