सलमानच्या अवस्थेवर चाहत्यांकडून काळजी व्यक्त. ; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन.

मुंबई : बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शुक्रवारी रात्री मुंबईतील स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटीच्या नवीव सपोर्ट सेंटरला त्याने भेट दिली. यावेळी पापाराझींनी काढलेला त्याचा व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमधील सलमानची अवस्था पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी सलमान खूपच आजारी आणि थकलेला दिसला. आपल्या फिटनेस आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जाणारा सलमान यात खूपच खंगलेला दिसला. त्यामुळे सलमानच्या या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी विविध प्रश्न उपस्थित केले. सोशल मीडियावर अनेकांनी सलमानच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली. यादरम्यान आता सलमाननेच एक क्रिप्टिक पोस्ट लिहित मौन सोडलं आहे.

काल रविवारी सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो पोस्ट केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, ‘तुम्हा लोकांची तब्येत कशी आहे?’ व्हायरल व्हिडीओनंतर आता सलमानची ही नवी पोस्ट चर्चेत आली आहे. शुक्रवारी सलमानने मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नव्याने बांधलेल्या ‘डेटा कलेक्शन अँड व्हेरिफिकेशन सपोर्ट सेंटर’च्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली. या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येताच चाहत्यांनी त्याच्या दिसण्यावरून चर्चेला सुरुवात केली. सलमानची तब्येत बरी दिसत नाहीये, असं एकाने लिहिलं. तर सलमानला काहीतरी झालंय, असं दुसऱ्याने म्हटलंय.

याआधीही सलमानने सोशल मीडियावर पोस्ट लिहित व्हायरल चर्चांवर आणि व्हिडीओंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. मे महिन्यात सलमानला मुंबईतील माहीम इथल्या हिंदुजा रुग्णालयातून बाहेर पडताना पापाराझींनी पाहिलं. तो तिथे एका जवळच्या मित्राला भेटायला गेला होता. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर आपल्या गाडीजवळ चालत जाताना पापाराझींनी त्याला घेरलं आणि त्याच्या चेहऱ्यावर कॅमेऱ्यांचे फ्लॅशलाइट्स चमकले. हे पाहून सलमान खान संतापला आणि त्याने पापाराझींना खडसावलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर त्याने लिहिलं होतं, ‘जर तुम्हाला माझ्या नुकसानीतून पैसे कमवायचे असतील, तर गप्प बसा.. चेष्टा करू नका. भाई भाई मातृभूमी.. भाई पिक्चर.. भाई हे… भाई ते.. चित्रपट महत्त्वाचा आहे की आयुष्य?’

सलमान लवकरच ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बॅटल ऑफ गलवान’ असं आधी या चित्रपटाचं नाव होतं. याचं दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत असून यामध्ये अभिनेत्री चित्रांगदा सिंहसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट भारताच्या लडाखमधील वादग्रस्त सीमावर्ती भाग असलेल्या गलवान खोऱ्यात 2020 मध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर आधारित आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles